देवीनं एक जळजळीत कटाक्ष जरी टाकला असता तरी राक्षसांचा आणि दृष्टांचा नायनाट झाला असता, ते भस्मसात झाले असते. परंतु, माता तसं करीत नाही, ती शस्त्र हातात घेते आणि असुरांना ठार करते, दुष्टांवर विजय मिळविते. दुष्ट प्रवृत्तींशी दोन हात करूनच लढणं आवश्यक आहे, हा संदेश या नवरात्रात आपल्याला मिळतो...
↧