जीवन नीतिमान बनवा, ही शिकवण सर्वच धर्मांत आहे. प्रत्येक आध्यात्मिक शिकवणीचा तो गाभा आहे. गौतम बुद्धाला केवळ जीवनावर प्रवचनं देण्यात रस नव्हता. त्यानं त्यापुढे जाऊन संदेश दिला. हा संदेश होता, 'समाधी'चा, मनाच्या गूढतेचा. हे गूढ समजण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. त्यानं मन शाबूत व काबूत ठेवता येतं...
↧