वारकऱ्याची वारीबद्दल जशी एकविधता, तशीच पंढरीसंबंधाने अनन्यता. किती? तर, ‘आणिक न करी तीर्थव्रत.’ पुराणांतरीही पंढरीचे महिमान गाईलेले आहे. ब्रह्मदेवाच्या प्रदीर्घ कालगणनेचा दिनांत, त्याचे शतवर्षांते गणित आणि अठ्ठावीस युगांची पूर्णता पंढरीस होते, इतकी ही नगरी जुनाट आणि चिरंतनही असल्याचे श्रीनामदेवराय सांगतात.
↧